कुटुंबातील मुल्ये

 कुटुंबातील मुल्ये

स्वाध्याय

प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ) प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते.

आ) सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते.

इ) आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे.

ई ) समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते.

2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा

अ) परिसरातील बदलांविषयी चे निर्णय कोणी घ्यायचे असतात?

उत्तर- परिसरातील बदलांविषयी चे निर्णय सर्वांनी मिळून घ्यायचे असतात.

आ) सहिष्णुता म्हणजे काय?

उत्तर- आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता.

इ) स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

उत्तर- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय.

ई) स्त्री-पुरुषांच्या समान गरजा कोणत्या?

उत्तर- अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या स्त्री-पुरुषांच्या समान गरजा आहेत.

3) पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा

अ) कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो?

उत्तर- कुटुंबात आपण सर्वजण एकत्र असलो, तरी प्रत्येकाच्या आवडीनिवडी, विचार, मत इतरांपेक्षा वेगळे असतात तरी; देखील अनेक बाबतीत आपले विचार इतरांशी जुळू शकतात. आपल्यामध्ये एकमेकांविषयी प्रेम आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो, घरातील कोणती गोष्ट ठरवताना घरातील सर्वांचा विचार करतो परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो

आ) सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते होते?

उत्तर- आपण एकत्र राहत असताना आपल्या सर्वांमध्ये काही गुणदोष असतात. एकमेकांचे विचार आपल्याला प्रत्येक वेळी पटत नाहीत. मित्र-मैत्रिणींमध्ये कधीकधी मतभेद होतात. अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे प्रसंगी दुसऱ्याचे ही ऐकले पाहिजे. यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते.


No comments:

Post a Comment

Thanks lot for your loveable comment plz follow and share