मायेची पाखर
स्वाध्याय
प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) पाहुण्यानी अगोदर जेवायचे का नाकारले?
उत्तर – वसतिगृहातील मुलानी केलेला तो
स्वयंपाक चांगला नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले.
आ) वसतिगृहातील मुलांच्यावर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती?
उत्तर – वसतिगृहातील मुलांवर अण्णांची
माया ही मातेप्रमाणे होती.
इ) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले?
उत्तर – आण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या
मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले.
ई) कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु
केल्या?
उत्तर – कर्मवीर भाऊराव रयत शिक्षण
संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु केल्या.
प्रश्न २) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड
होते.
आ) स्वतःची मायेची शाल त्याच्या अंगावर घातली.
इ) त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई
नव्हती.
ई) “अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात.”
प्रश्न ३) कोण कोणाला म्हणाले ते लिहा.
अ) “आता इथंच मुक्काम करा !”
- अण्णा पाहुण्यांना म्हणाले.
आ) “जा रे, स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल
ते घेऊन ये बघू!”
- आण्णा एका
मुलाला म्हणाले.
इ) “आपणांस उदंड आयुष्य मिळो!”
- लेखक आण्णांना
म्हणाले.
प्रश्न ४) थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) लेखक उपाशी आहेत, हे समजल्यावर अण्णांनी
काय केले?
उत्तर – लेखक
उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला स्वयंपाकघरात काही शिल्लक आहे का
पाहण्याची आज्ञा केली. तेंव्हा मुलगा धावत जाऊन स्वयंपाकघरातून पिठले, भाकरी,
कांदा, तेल घेऊन आला.
(आ) मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला?
उत्तर –
मध्यरात्रीनंतर कशाची तरी चाहूल लागल्याचे निमित्त होऊन लेखकाला जाग आली. लेखकाला
दिसले की आण्णा उठले आहेत. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली
की नाही, त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे पाहू लागले. एक मुलगा थंडीने
कुड्कुडत होता. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या हातांनी उचलले.
स्वतःच्या बिछ्यान्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्याला
अगदी पोटाशी धरले. त्या उबेत मुलगा झोपी गेला. हा प्रसंग घडला.
(इ)
सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले?
उत्तर – “अण्णा,
आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे, तर या महाष्ट्रातील गोरगरीबांच्या
मुलांचे आपण पालक आहात. आपणांस उदंड आयुष्य मिळो !” हे उद्गार लेखकांच्या तोंडून
निघाले.
प्रश्न ५) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
यांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’’ गट
(३) डोळा लागणे (इ) एखादी गोष्ट करायचे टाळणे
(४) झटत राहणे (ई) खूप भूक लागणे
प्रश्न ६) लेखकाच्या पोटात कावळे ओरडत
होते, म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यांतील रंगीत शब्दांचा
अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) भरपूर जेवण झाल्यावर
नाना अजगरासारखे पडून होते.
- भरपूर जेवण केल्यामुळे नानांना झोप आली त्यामुळे ते झोपले. जेंव्हा
खूप झोप येते तेंव्हा हा वाक्प्रचार वापरतात. याठिकाणी नानांची झोपण्याची कृती
दाखवण्या साठी अजगरा सारखे पडून होते हा वाक्प्रचार वापरला आहे.
(आ) दुपारच्या वेळी हळूच
खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही; म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात.
- मांजराचे पाय मऊ असतात उंचावरून उडी मारली तरी त्याच्या पायाचा आवाज
होत नाही. मांजर जेंव्हा चोरुन दूध पिते तेंव्हा त्याचा आवाज होत नाही. त्यामुळे
एखादी गोष्ट. चोरुन करताना कोणताही आवाज न करता केली तर मांजरीच्या
पायाचा हा वाक्प्रचार वापरतात.
प्रश्न ७) लिहा.
लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे.
तसा तुम्हांला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळींत लिहा.
- मला आदर वाटणारी व्यक्ती म्हणजे
स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांना आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त
व्हावा असे लहानपणापासून वाटायचे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने देश स्वतंत्र
करण्यासाठी क्रांतिकार्याला वाहून घेतले होते. त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि ते
लहान असतानाच मित्रमेळा संघटना काढून आपल्या लहान मित्रांना क्रांतिकार्याची शिकवण
दिली. देशप्रेमाचे धडे दिले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. त्यांनी
देशाला स्वतंत्र करण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. असे हे थोर क्रांतिकारक
देशकार्याला वाहून घेण्यास आपणांस सदैव प्रेरणा देतात.
प्रश्न ८)
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
अ) सकाळची वेळ होती.
कोवळे ऊन सगळीकडे पसरले होते. जणू निसर्गाने पिवळा सोनेरी गालिच्या पांघरला आहे
असेच दिसत होते. कळ्यांची फुले उमलली होती. फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून
तिकडे उडत होती. वातावरण खूप आनंदी होते. मी सुद्धा त्या अनादादाई वातवरणात
बागेमध्ये मस्त भटकत होतो.
आ) बागेत गेल्यावर
मला एक अळी दिसली......अळी पानावर होती. तिने अर्धे पान कुरतडून टाकले
होते. कदाचित ती फुलापाखराची अळी असणार म्हणून मी तिला पानावरून कडून टाकले नाही.
थोड्या दिवसाने तिचे फुलपाखरात रुपांतर होईल. अळीचे फुलपाखरू झालेले मला पहायला
खूप आवडेल.