दिनांक 10 मे 2021 रोजी पॅलेस्टाईन च्या हमास या दहशतवादि संघटनेने 1200 रॉकेट्स इस्राईल वर डागले आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या युद्धाला सुरुवात झाली. ह्या हल्ल्याचे कारण होते इस्राइल च्या supreme कोर्टाने दिलेला निकाल त्या निकालानुसार इस्राईल च्या शेख जराह ह्या भागातील पॅलेस्टिन लोकांच्या मिळकतीवर आणि घरांवर आता ज्यू लोकांचा ताबा असणार........ हे ऐकायलाच विचित्र वाटते पण; त्याची पार्श्वभूमी हि तशीच विवादित आहे ती अशी की, जर्मनी मध्ये ज्यावेळी हिटलर ची हुकूमशाही होती त्यावेळी मोठ्याप्रमाणात ज्यू लोकांचे स्थलांतर झाले आणि ज्यू लोकांनी middle ईस्ट मधल्या अरब लोकांकडून ह्या मिळकती आणि जमिनी विकत घेतल्या पण 1948 ला इस्राईल आणि पॅलेस्टाईन सामंजस्य करार (46% इस्राईल 42% पॅलेस्टाईन 12% जेरुसलेम[UNO] ) झाला त्यावेळी हि जागा पॅलेस्टिने लोकांच्या वाटेला आली, पण आता इस्राएल मधील जु लोकांनी कोर्टात दावा केला आणि कोर्टाने 1936-37 चा दाखल देत ज्यू लोकांच्या बाजूने निकाल दिला आणि शेख जाररह सह जेरुसलेम मध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. आणि पूर्वी पासून इस्राएल वर रोखून असलेल्या पॅलेस्टिने(मुस्लिम) लोकांचे शासन असलेल्या गाझा पट्टीमधून हमास ह्या दहशतवादी संघटनेने इस्रेल च्या नागरी भागात हल्ला केला. तसा इस्राएल वर त्याचा फार काही परिणाम झाला नाही कारण, जगातील प्रगत Iron dome defence system इस्राएल कडे आहे त्यावेळी हमास च्या रॉकेट चा हवेतच भुगा झाला. 2 ते 3 रॉकेट्स इस्राईल च्या नागरी भागात पडेल आणि थोडे फार नुकसान झाले.
इस्राएल ने आपली सर्व यंत्रणा तयारीला लावून सतत गेले आठ दिवस झाले गाझा पट्टीवर हल्ले होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जैविक आणि वित्त हानी होत आहे. बेंजामिन नेत्यांनाहू ने म्हंटल्याप्रमाणे इस्राईल आता हमास ला पूर्न नष्ट करण्याच्या तयारीत आहे. इस्राईल सारख्या प्रगत आणि जगातील अग्रगण्य सैन्याचा सामना करण्याची हमास ची कुवत नाही तो भाग वेगळा पण; ह्या सर्व गोष्टी मुळे संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धकडे लागले आहे बहुतांश मुस्लिम देशात इस्राईल विरोधात आंदोलने छेडली जात आहेत. भारतामध्ये सुद्धा गेले आठवडभर #westandwith_palastine #westandwith_isreal अशा प्रकारचे hashtag trending ला आले आहेत.
भारताच्या भूमिके बद्दल जर विचार केला तर इस्राएल हा आपला जवळचा मित्र राष्ट् आहे तसेच सैन्यासाठी लागणारे प्रगत तंत्रज्ञान इस्राईल आपल्याला पुरवते तसेच भारत सुरुवातीपासून दाहशतवादा विरोधात आहेत. दुसरीकडे इस्राईल सैन्य गाझा पट्टी पूर्णपणे उध्वस्त करत आहे सामान्य नागरिकाना सुद्धा आपले जीव गमवावे लागत आहेत मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण पॅलेस्टिने चा विचार केला तर इस्राईल नाराज होऊ शकते तसेच सगळे अरब देश पॅलेस्टिने च्या बाजूने आहेत आणि आपला सगळ्यात मोठा pretrolium चा sourse अरब राष्ट्र(इराण) आहेत व जवळ जवळ 55 लाख भारतीय लोक अरब राष्ट्रांमध्ये नोकरी धंद्या निम्मित आहेत. दुसरी बाब म्हणजे इतिहास बघितला तर इस्रेल ने पॅलेस्टिने वर कब्जा करून आपले राष्ट्र स्थापिले आहे. जर आपण UNO उघडपणे इस्रेल ची बाजू घेतली तर पाकिस्तान च्या कब्जा मध्ये असलेला POK आणि चीन च्या कब्जा मध्ये असलेला आक्साई चीन ह्या भागावर भारताची UNO मधील दावेदारी कमकुवत होऊ शकते. अशाप्रकारे आपल्या दोन्ही राष्ट्रांपैकी कुणालाही दुखावता येणार नाही त्यामुळे ह्या वादावर भारताने तठस्त राहने योग्य ठरेल.