शब्दयुवा Education
शैक्षणिक माहिती असणारा सुंदर ब्लॉग
Tuesday, 10 June 2025
Tuesday, 3 June 2025
matta dayitv मत्ता दायित्व pdf
दर वर्षाच्या मार्च महिन्यात प्रत्येक शासकीय व्यक्ती ला भरून द्यावाच लागणारा मत्ता दायित्व Form.
Wednesday, 28 May 2025
Sunday, 4 May 2025
बारावी निकाल HSC Result 2025
दि. 5/5/2025 रोजी बारावी निकाल 1 च्या पुढे खालील लिंक ला क्लिक करून पाहू शकता 👇👇
https://hscresult.mahahsscboard.in/
Friday, 1 November 2024
धूळ पेरणी इयत्ता ४ थी
धूळ पेरणी इयत्ता ४ थी
स्वाध्याय
प्रश्न
१) एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ)
कोणाचा जीव झुरणीला
लागला?
उत्तर –
मातीचा जीव झुरणीला लागला आहे.
आ)
धरणीला कशाचा ध्यास आहे?
उत्तर –
धरणीला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्या पिकांचा ध्यास लागला आहे.
इ)
कोणते दिवस येऊ नयेत असे
कवीला वाटते?
उत्तर – जाचक
दिवस म्हणजेच दुष्काळाचे दिवस येऊ नयेत असे काविला वाटते.
प्रश्न
२) थोडक्यात उत्तरे लिहा.
अ)
कोरडे नक्षत्र गेल्यावर
शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील?
उत्तर - शेतकऱ्याने पेरणी केल्यानंतर जर नक्षत्र कोरडे गेले
तर आपले पिक येईल का? त्याला पाणी मिळेल का? पाणी नाही मिळाले तर शेत पिकणार नाही,
जनावरांना चारा मिळणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. हे असे अनेक विचार त्याच्या मनात
येतील.
आ)
शेतकऱ्याच्या शेतात भरपूर
पिक आले तर, त्याच्या मनात कोणते विचार येतील?
उत्तर –
रानातील भरपूर पिक पाहून शेतकऱ्याचे मन आनंदाने भरून जाईल. सर्वांना पोटभर अन्न मिळेल धन्याच्या राशी पडतील त्यातून पैसे मिळतील
आणि घरातील सर्वांना नवनवीन वस्तू घेता येतील. असे विचार त्याच्या मनात येतील.
इ)
पाऊस पडला नाहीतर काय
होईल असे तुम्हाला वाटते?
उत्तर – पाऊस
नाही पडला तर जमिनीला पिकांना पाणी मिळणार नाही. पिके उगवून येणार नाही खायला अन्न
मिळणार नाही. जनावरे, माणसे उपाशी मरू लागतील. दुष्काळ पडेल पिण्यासाठी सुद्धा पाणी
मिळणार नाही.
प्रश
३) ओळी पूर्ण करा.
अ) असो बरकत (इ) कासावीस डोळे
धूळ पेरणीला बनले
चातक
आ) टिपूर मोत्यांची (ई)
मिळता डोळ्यांना
आस मोरणीला मेघुट
इशारे
प्रश्न
४) खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
(अ)
हिरव्या पिसांचा
ध्यास धरणीला
अर्थ – विविध
पक्षांना पिसे असतात त्या पिसांमुळे पक्षांचे सौंदर्य खुलून दिसते, ते मनमोहक वाटतात.
अगदी तसीच मनमोहक हिरवी पिसे म्हणजेच हिरवे पिक आपल्या कुशीतून उगवून यावे असा ध्यास
धरणीला म्हणजे जमिनीला लागला आहे.
(आ)
मातीच्या कणाला
फुटले धुमारे.
अर्थ – पाऊस
पडल्यानंतर जीमिनीत पेरलेल्या बियांना अंकुर फुटू ते अंकुर जमिनीतून वर आल्या नंतर
जणू जमिनीतून धुमारे फुटलेत असे वाटत आहे.
प्रश्न
५) पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला, की शेतकर्यांना दिवस जाचक म्हणजेच त्रासाचे वाटू
लागतात परिसरातील खालील व्यक्तीना कोणते दिवस जाचक वाटत असतील याविषयी त्यांच्याशी
चर्चा करून लिहा.
अ) बांधकामावर काम करणारे मजूर
बरेच दिवस बांधकामाचे
काम नाही मिळाले तर ते दिवस जाचक वाटणार आहेत.
आ)
आई वडील
मुलगा किंवा मुलगी शाळा
शिकण्यासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेल्यानंतरचे दिवस आई वडिलांना जाचक वाटणार आहेत.
इ)
उसतोडणी कामगार
साखर कारखाने बंद असणारे
दिवस यांना जाचक वाटणार आहेत.
ई) शिक्षक
शैक्षणिक काम सोडून इतर
कामे जसे कि निवडणूक कामकाज , मतदार नोंदणी कामकाज अशी अशैक्षणिक कामे असणारे दिवस
शिक्षकांना जाचक वाटणार आहेत.
उ)
शाळेबाहेर खाऊ विकणारे
शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्या नंतर चे
दिवस यांना जाचक वाटणार आहेत.
प्रश्न
६) ही कविता धूळपेरणीची आहे. या कवितेत शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही
तर त्याला शेती करता येणार नाही. या उलट काही लोकांना खूप पाऊस आला, तर काम /
व्यवसाय करता येणार नाही. आशा लोकांची माहिती घ्या. उदा. , रस्त्याच्या कडेला बसून भाजी
विकणारे.
रस्ता बांधकाम
करणारे मजूर
विटा बनवणारे
कामगार
रस्त्याच्या कडेला
फळे पेपर विकणारे.
माती पासून वस्तू
बनवणारे कारागीर.
Saturday, 28 September 2024
महात्मा गांधी भाषण
राष्ट्रपिता महात्मा गांधी
विविध प्रांत, भाषा, वर्ण, वंश यांनी नटलेल्या भारत देशावर सुमारे साडेतीनशे वर्षे इंग्रजांनी जुलमी राज्य केले. आपल्या भारतभूमीला गुलाम बनवले. याच्या विरोधात मोठ्या हिमतीने आव्हान जर कोणी दिले असेल तर; ते होते भारताचे बापूजी म्हणजेच महात्मा गांधी.
आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात काठी आणि बंदुकीचा वापर नाही केला. त्यांनी सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या तीन तत्वांचा अवलंब केला. यांच्या जोरावरच त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. गांधीजींना माहित होते इंग्रजांच्या शस्त्रा पुढे निशस्त्र शेतकऱ्यांचा कधीच टिकाव लागणार नाही. यांच्याशी मुकाबला करायचा असेल तर त्यांना व त्यांच्या धोरणांना विरोधच केला पाहिजे, म्हणून त्यांनी सत्याग्रह आणि असहकाराची आंदोलने उभी केली.
त्यांनी केलेला सगळ्यात पहिला सत्याग्रह म्हणजेच चंपारण व खेडा सत्याग्रह. त्याकाळी इंग्रज... शेतकऱ्यांवर जबरदस्तीने कर आकारणी करत असत. इंग्रज जे सांगतील तेच पीक शेतकऱ्यांनी पिकवायचे असा दंडक असायचा. या जाचाला शेतकरी कंटाळले होते. त्यातच दुष्काळ आणि अवर्षण याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले होते. अशी केविलवाणी अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. यातून या जाचातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी गांधीजींनी कंबर कसली. चंपारण व खेडा येथे निळ पिकवण्याच्या अन्यायकारी निर्णयाविरोधात पहिला सत्याग्रह घडवून आणला. सर्व शेतकऱ्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देऊन निळ पिकवण्यावर बहिष्कार घातला. शेतकऱ्यांची ही एकी पाहून इंग्रजांनी आपली सक्ती मागे घेतली. इथून पुढे गांधीजींनी हेच आपले समाजसेवेचे व लोक हिताचे कर्तव्य मानून, शास्त्र समजून देश सेवेसाठी सर्वस्व वेचले अशा या महात्म्यास माझा शतशः प्रणाम....
Thursday, 12 September 2024
मायेची पाखर
मायेची पाखर
स्वाध्याय
प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा
अ) पाहुण्यानी अगोदर जेवायचे का नाकारले?
उत्तर – वसतिगृहातील मुलानी केलेला तो
स्वयंपाक चांगला नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले.
आ) वसतिगृहातील मुलांच्यावर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती?
उत्तर – वसतिगृहातील मुलांवर अण्णांची
माया ही मातेप्रमाणे होती.
इ) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले?
उत्तर – आण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या
मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले.
ई) कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु
केल्या?
उत्तर – कर्मवीर भाऊराव रयत शिक्षण
संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु केल्या.
प्रश्न २) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड
होते.
आ) स्वतःची मायेची शाल त्याच्या अंगावर घातली.
इ) त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई
नव्हती.
ई) “अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात.”
प्रश्न ३) कोण कोणाला म्हणाले ते लिहा.
अ) “आता इथंच मुक्काम करा !”
- अण्णा पाहुण्यांना म्हणाले.
आ) “जा रे, स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल
ते घेऊन ये बघू!”
- आण्णा एका
मुलाला म्हणाले.
इ) “आपणांस उदंड आयुष्य मिळो!”
- लेखक आण्णांना
म्हणाले.
प्रश्न ४) थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) लेखक उपाशी आहेत, हे समजल्यावर अण्णांनी
काय केले?
उत्तर – लेखक
उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला स्वयंपाकघरात काही शिल्लक आहे का
पाहण्याची आज्ञा केली. तेंव्हा मुलगा धावत जाऊन स्वयंपाकघरातून पिठले, भाकरी,
कांदा, तेल घेऊन आला.
(आ) मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला?
उत्तर –
मध्यरात्रीनंतर कशाची तरी चाहूल लागल्याचे निमित्त होऊन लेखकाला जाग आली. लेखकाला
दिसले की आण्णा उठले आहेत. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली
की नाही, त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे पाहू लागले. एक मुलगा थंडीने
कुड्कुडत होता. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या हातांनी उचलले.
स्वतःच्या बिछ्यान्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्याला
अगदी पोटाशी धरले. त्या उबेत मुलगा झोपी गेला. हा प्रसंग घडला.
(इ)
सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले?
उत्तर – “अण्णा,
आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे, तर या महाष्ट्रातील गोरगरीबांच्या
मुलांचे आपण पालक आहात. आपणांस उदंड आयुष्य मिळो !” हे उद्गार लेखकांच्या तोंडून
निघाले.
प्रश्न ५) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
यांच्या जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’’ गट
(३) डोळा लागणे (इ) एखादी गोष्ट करायचे टाळणे
(४) झटत राहणे (ई) खूप भूक लागणे
प्रश्न ६) लेखकाच्या पोटात कावळे ओरडत
होते, म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यांतील रंगीत शब्दांचा
अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) भरपूर जेवण झाल्यावर
नाना अजगरासारखे पडून होते.
- भरपूर जेवण केल्यामुळे नानांना झोप आली त्यामुळे ते झोपले. जेंव्हा
खूप झोप येते तेंव्हा हा वाक्प्रचार वापरतात. याठिकाणी नानांची झोपण्याची कृती
दाखवण्या साठी अजगरा सारखे पडून होते हा वाक्प्रचार वापरला आहे.
(आ) दुपारच्या वेळी हळूच
खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही; म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात.
- मांजराचे पाय मऊ असतात उंचावरून उडी मारली तरी त्याच्या पायाचा आवाज
होत नाही. मांजर जेंव्हा चोरुन दूध पिते तेंव्हा त्याचा आवाज होत नाही. त्यामुळे
एखादी गोष्ट. चोरुन करताना कोणताही आवाज न करता केली तर मांजरीच्या
पायाचा हा वाक्प्रचार वापरतात.
प्रश्न ७) लिहा.
लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे.
तसा तुम्हांला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळींत लिहा.
- मला आदर वाटणारी व्यक्ती म्हणजे
स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांना आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त
व्हावा असे लहानपणापासून वाटायचे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने देश स्वतंत्र
करण्यासाठी क्रांतिकार्याला वाहून घेतले होते. त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि ते
लहान असतानाच मित्रमेळा संघटना काढून आपल्या लहान मित्रांना क्रांतिकार्याची शिकवण
दिली. देशप्रेमाचे धडे दिले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. त्यांनी
देशाला स्वतंत्र करण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. असे हे थोर क्रांतिकारक
देशकार्याला वाहून घेण्यास आपणांस सदैव प्रेरणा देतात.
प्रश्न ८)
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
अ) सकाळची वेळ होती.
कोवळे ऊन सगळीकडे पसरले होते. जणू निसर्गाने पिवळा सोनेरी गालिच्या पांघरला आहे
असेच दिसत होते. कळ्यांची फुले उमलली होती. फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून
तिकडे उडत होती. वातावरण खूप आनंदी होते. मी सुद्धा त्या अनादादाई वातवरणात
बागेमध्ये मस्त भटकत होतो.
आ) बागेत गेल्यावर
मला एक अळी दिसली......अळी पानावर होती. तिने अर्धे पान कुरतडून टाकले
होते. कदाचित ती फुलापाखराची अळी असणार म्हणून मी तिला पानावरून कडून टाकले नाही.
थोड्या दिवसाने तिचे फुलपाखरात रुपांतर होईल. अळीचे फुलपाखरू झालेले मला पहायला
खूप आवडेल.